Pratapgadavaril parakram swadhay iyatta chouthi

प्रतापगडावरील  पराक्रम

इयत्ता - चौथी.



प्र १) दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द तयार करा.

१) ता, ग, प्र, ड,प

प्रतापगड

२) व, रा, य, शि

शिवराय

३) खा, अ, ज,न, ल, फ

अफजलखान

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) अफजलखानाने कोणता विडा उचलला ?

अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा उचलला.

२) प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला ?

प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना निरोप पाठवला की, ' तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. मी तुम्हांला आदिलशाहाकडून सरदारकी देववितो.

प्र ३) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना  देण्याचे का ठरवले ?

अफजल खान चालून येत आहे. हे स्वराज्यावर आलेले मोठे संकट आहे. हे शिवरायांनी ओळखले. अफजलखान कपटी होता. त्याची फौज मोठी होती. तर शिवरायांचे राज्य लहान व सैन्यही कमी होते. उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही हे शिवरायांनी ओळखले होते. म्हणून शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीने सामना देण्याचे ठरवले.

२) अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले ?

अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले, " गड्यांनो आपापली कामे नीट करा. भवानीआई यश देणार आहे, पण समजा आमचे काही बरेवाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या  आज्ञेत वागा. रयत सुखी करा."

प्र ४) कारणे लिहा.

१) शिवराय प्रतापगडावर गेले, ही बातमी खानाला कळताच तो चिडला.

शिवराय प्रतापगडावर गेले, ही बातमी खानाला कळताच तो चिडला कारण त्याला माहीत होते, प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला डोंगरावर होता. सभोवताली घनदाट जंगल होते. वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जाण्यासाठी चांगली वाट नव्हती. तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट होता.

२) विजापुरात हाहाकार उडाला.

शिवरायांनी विजापूरचा बलाढ्य सरदार अफजलखान यास ठार मारले. खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. अफजलखानाचा मुलगा फाजलखान कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला. त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या